देव, दैत्य वा सुर, नर, किन्नर
उचलुं न शकले त्यास तसूभर
तसूभरी ना सरलपणा त्या चापाचा वांकला
कोण वांकवुन त्याला ओढिल ?
प्रत्यंचा त्या धनूस जोडिल ?
सोडिल त्यांतुन बाण असा तर कोणी ना जन्मला
उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर
निजनयनीं तें धनू पहा तर
बघा राघवा, सौमित्री तर औत्सुक्यें दाटला
उत्साहाने निघती मुनिजन
चला संगतीं दोघे आपण
आपण होतां सहप्रवासी भाग्यतरू ये फला
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.