गदिमा नवनित
  • एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे
    जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)
  • आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.

    आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.

    गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
  • Box-C-19
  • अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें
    Anupamey Ho Suru Yudha He Ram Ravanache

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे      Singer: Pramodini Joshi,Mandakini Pande
  • अल्बम: गीतरामायण (आकाशवाणी)      Album: GeetRamayan (Akashwani)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
    अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें

    सशंख राक्षसगण तो दिसला
    कष्णघनांवर बलाकमला
    मुखांतुनी शत गर्जे चपला
    रणांगणावर कोसळलें तों पाउस बाणांचे

    नाचत थय थय खिंकाळति हय
    गजगर्जित करि नादसमन्वय
    भीषणता ती जणूं नादमय
    त्या नादांतच मिळले पदरव प्लवग-राक्षसांचे

    दंत दाबुनी निज अधरांवर
    वानरताडण करिती निशाचर
    नभांत उडती सदेह वानर
    शस्त्र म्हणुन ते घाव घालिती वृक्ष-पर्वतांचे

    "जय दाशरथी, जय तारासुत"
    प्रहार करिती वानर गर्जत
    झेलित शस्‍त्रां अथवा हाणित
    भरास आलें द्वंद्व जणूं कीं महासागरांचे

    गदा, शूळ वा लागुन शक्ति
    राक्षस वानर घेती मुक्ति
    रणांत पडती अपुल्या रक्तीं
    'जय लंकाधिप' घोष घुमविती अरी वानरांचे

    द्वीप कोसळे, पडला घोडा
    वर बाणांचा सडा वांकडा
    'हाणा मारा, ठोका तोडा'
    संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे

    रणांत मरतां आनंदानें
    मांसकर्दमीं फुलतीं वदनें
    तींहि तुडविलीं जातीं चरणें
    रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे

    कलेवरावर पडे कलेवर
    ऋक्ष, निशाचर, नकळे वानर
    मरणांहुनही शौर्य भयंकर
    कैक योजनें उडुनी जाती भाग अवयवांचे

    चक्रें, चरणें, हस्त, लांगुलें
    शुंडा, ग्रीवा, शिरें, पाउलें
    पडलें तें शतखण्डित झालें
    प्रलयकाळसें अंग थरारे धरणी-गगनाचें

    द्वंद्व तरी हो कुठें कुणाचें
    काळमुखांतुन कोणी वांचे
    कुठे कुणाचें कबंध नाचे
    धुमाळींत त्या कोणा नुरलें भानच कोणाचें


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs