गदिमा नवनित
  • पळून गेलेल्या काळाच्या कानात,
    माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे.
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें
    Anupamey Ho Suru Yudha He Ram Ravanache

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
    अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें

    सशंख राक्षसगण तो दिसला
    कष्णघनांवर बलाकमला
    मुखांतुनी शत गर्जे चपला
    रणांगणावर कोसळलें तों पाउस बाणांचे

    नाचत थय थय खिंकाळति हय
    गजगर्जित करि नादसमन्वय
    भीषणता ती जणूं नादमय
    त्या नादांतच मिळले पदरव प्लवग-राक्षसांचे

    दंत दाबुनी निज अधरांवर
    वानरताडण करिती निशाचर
    नभांत उडती सदेह वानर
    शस्त्र म्हणुन ते घाव घालिती वृक्ष-पर्वतांचे

    "जय दाशरथी, जय तारासुत"
    प्रहार करिती वानर गर्जत
    झेलित शस्‍त्रां अथवा हाणित
    भरास आलें द्वंद्व जणूं कीं महासागरांचे

    गदा, शूळ वा लागुन शक्ति
    राक्षस वानर घेती मुक्ति
    रणांत पडती अपुल्या रक्तीं
    'जय लंकाधिप' घोष घुमविती अरी वानरांचे

    द्वीप कोसळे, पडला घोडा
    वर बाणांचा सडा वांकडा
    'हाणा मारा, ठोका तोडा'
    संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे

    रणांत मरतां आनंदानें
    मांसकर्दमीं फुलतीं वदनें
    तींहि तुडविलीं जातीं चरणें
    रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे

    कलेवरावर पडे कलेवर
    ऋक्ष, निशाचर, नकळे वानर
    मरणांहुनही शौर्य भयंकर
    कैक योजनें उडुनी जाती भाग अवयवांचे

    चक्रें, चरणें, हस्त, लांगुलें
    शुंडा, ग्रीवा, शिरें, पाउलें
    पडलें तें शतखण्डित झालें
    प्रलयकाळसें अंग थरारे धरणी-गगनाचें

    द्वंद्व तरी हो कुठें कुणाचें
    काळमुखांतुन कोणी वांचे
    कुठे कुणाचें कबंध नाचे
    धुमाळींत त्या कोणा नुरलें भानच कोणाचें


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी | Related Marathi Songs