गदिमा नवनित
  • विठ्ठलाचे पायी थरारली वीट, उठला हुंदका देहुच्या वार्‍यात,तुका समाधीत चाळवला.
    संत माळेतील मणी शेवटला,आज ओघळला एकाएकी....
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • स्वयंवर झाले सीतेचे
    Swayamvar Zale Siteche

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
    स्वयंवर झालें सीतेचे

    श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
    पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
    उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें

    मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
    नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
    फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें

    उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
    तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
    श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

    अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
    मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
    तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

    हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
    "आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
    आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

    पित्राज्ञानें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
    अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
    गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें

    नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
    तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
    सभामंडपी मीलन झालें माया-ब्रम्हाचे

    झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
    गगनामाजीं देव करांनी करिती करताला
    त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे

    अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
    गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
    आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs