गदिमा नवनित
  • अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा
    Ashraya Guhe Kade Jankis Patha

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा
    चापबाण घ्या करीं सावधान राघवा !

    मेघगर्जनेपरी, काननांत हो ध्वनी
    धांवतात श्वापदें, भक्ष्यभाग टाकुनी
    कोंकतात भेंकरें, कंपितांग थांबुनी
    धूळ ही नभीं उडे, सैन्य येतसे कुणी
    खूण ना दिसो कुणा, दीप्त अग्‍नि शांतवा

    उत्तरेस तो थवा, काय तर्क बांधुनी ?
    पाहतोंच काय तें, तालवृक्षिं जाउनी
    कोण येइ चालुनी, निर्मनुष्य ह्या वनीं
    सिद्ध राहूं द्या तळीं, चाप रज्जू ओढुनी
    पाहुं वीर कोण तो, दावि शौर्य-वैभवा

    कैक पायिं धांवती, हस्ति अश्व दौडती
    धर्मस्‍नात सारथी, आंत ते महारथी
    कोण श्रेष्ठ एक तो, राहिला उभा रथीं
    सांवळी तुम्हांपरी, दीर्घबाहु आकृती
    बंधु युद्धकाम का, शोधुं येइ बांधवा ?

    भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो
    येउं दे पुढे जरा, कंठनाल छेदतों
    कैकयीस पाहूं दे, छिन्न पुत्रदेह तो
    घोडदौड वाजते, ये समीप नाद तो
    ये पुनश्च आज ही, संधी शस्त्रपाटवा

    एक मी उभा इथें, येउं देत लाख ते
    लोकपाल तो नवा, स्वत्वहीन लोक ते
    क्षम्य ना रणांगणीं, पोरकेंहि पोर तें
    शत्रुनाश क्षत्रियां, धर्मकार्य थोर तें
    ये समोर त्यास मी, धाडितोंच रौरवा

    नावरेच क्रोध हा बोधिल्या अनेकदा
    राम काय जन्मला सोसण्यास आपदा
    हो‍उं देच मेदिनी पापमुक्त एकदा
    भरतखंड भोगुं दे रामराज्य संपदा
    धर्मरक्षणी-क्षणीं, मी अजिंक्य वासवां


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs