गदिमा नवनित
  • या वस्त्रांते विणतो कोण?,एकसारखी नसती दोन
    कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • सुग्रीवा, हें साहस असलें
    Sugriva He Sahas Asale

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • सुग्रीवा, हें साहस असलें
    भूपतीस तुज मुळिं न शोभलें

    अटीतटीचा अवघड हा क्षण
    मायावी तो कपटी रावण
    भिडलासी त्या अवचित जाउन
    काय घडें तें नाहीं कळलें

    विचारल्याविण मला, बिभिषणा
    सांगितल्याविण नला, लक्ष्मणा
    कुणा न देतां पुसट कल्पना
    उड्डणा तव धाडस धजलें

    ज्ञात मला तव अपार शक्ति
    माझ्यावरची अलोट भक्ति
    तरीहि नव्हतें योग्य संप्रति
    अनपेक्षित हें कांहीं घडले

    द्वंद्वे जर तुज वधणें रावण
    वृथा जमविलीं सैन्यें आपण
    कशास यूथप वा वानरगण
    व्यर्थच का हे ऋक्ष मिळविले ?

    काय सांगुं तुज, शत्रुदमना
    नृप नोळखती रणीं भावना
    नंतर विक्रम, प्रथम योजना
    अविचारें जय कुणा लाभले ?

    तू पौलस्त्यासवें झुंजता
    क्षीण क्षण जर एकच येता
    सन्मित्राते राघव मुकता
    तव सैनिक मग असते खचले

    काय लाभतें या द्वंद्वानें ?
    फुगता रावण लव विजयानें
    लढते राक्षस उन्मादानें
    वानर असते परतच फिरले

    दशकंठचि मग विजयी होता
    मैथिलीस मग कुठुन मुक्तता ?
    व्यर्थच ठरतीं वचनें शपथा
    कुणी राक्षसां असतें वधिलें ?

    जा सत्वर जा, जमवी सेना
    करी रणज्ञा, सुयोग्य रचना
    आप्त-सैन्यासह वधूं रावणा
    व्यर्थ न दवडी शौर्य आपुलें


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs