गदिमा नवनित
  • उचललेस तू मीठ मुठभर,साम्राज्याचा खचला पाया!
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • वालीवध ना,खलनिर्दालन
    Valivadh Na Khalnirdalan

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • मी धर्माचें केलें पालन
    वालीवध ना, खलनिर्दालन

    अखिल धरा ही भरतशासिता
    न्यायनीति तो भरत जाणता
    त्या भरताचा मी तर भ्राता
    जैसा राजा तसे प्रजाजन

    शिष्य, पुत्र वा कनिष्ठ भ्राता
    धर्मे येते त्यास पुत्रता
    तूं भ्रात्याची हरिली कांता
    मनीं गोपुनी हीन प्रलोभन

    तूं तर पुतळा मूर्त मदाचा
    सुयोग्य तुज हा दंड वधाचा
    अंत असा हा विषयांधांचा
    मरण पशूचें पारध हो‍उन

    दिधलें होतें वचन सुग्रिवा
    जीवहि देइन तुझिया जिवा
    भावास्तव मी वधिलें भावा
    दिल्या वचाचें हें प्रतिपालन

    नृपति खेळती वनिं मृगयेतें
    लपुनि मारिती तीर पशूतें
    दोष कासया त्या क्रीडेतें
    शाखामृग तूं क्रूर पशूहुन

    अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
    सांभाळिन मी तुझ्या अंगदा
    राज्य तुझें हें, ही किष्किंधा
    सुग्रीवाच्या करीं समर्पण


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs